गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-37* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे* 8308677799 8806150248 *15 मार्च 1959 रोजी मुंबईतील गिरगाव मधील एका इमारतीच्या छतावर सात महिला एकत्र येतात. घरातील काम सांभाळून इतर काहीतरी काम करावे हा त्यांचा एकत्र येण्याचा उद्देश असतो.मग त्या एक व्यवसाय सुरू करतात. त्यांची पहिल्या दिवसाची पहिली कमाई होती 50 पैसे.मग पुढे तो व्यवसाय वाढत जातो.7 महिला काम करणारा उद्योग 45000 हजार महिला कामगारांचा होतो.सुरवातीला कर्जाऊ घेतलेल्या 80 रुपये भांडवलाचा उद्योग सोळाशे कोटीचा होतो.ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा तो उद्योग म्हणजे श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड .*. या उद्योगाचे वैशिष्ट्ये म्हणजे नुकसान व नफ्यात सर्व महिलांची सामूहिक जबाबदारी असते.महिलाच सहमालक असणारा जगातील एकमेव उद्योग म्हणजे लिज्जत पापड उद्योग. धर्मदाय संस्थेप्रमाणे हा उद्योग काम करतो ही उत्पादक कंपनी नाही.छगनलाल पारेख व पुरषोत्तम दामोदर यांनी सुरवातीपासून या उद्योगाला पाठिंबा दिला. .महिलांना कमीत कमी प...