गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९८
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -98-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे त्याचा जन्म 27 डिसेंबर 1797 साली झाला.तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील लढाईत मारले गेले.त्यांनतर काका आणि आजोबा यांनी त्याला लहानचे मोठे केले.मौलाना मुअज्जम व अब्दुस्समद या दोघांनी त्याला फारशी,उर्दू,भाषेत पारंगत गेले होते.भाषेच्या भक्कम बैठकीमुळे त्याला शायरी लिहणे सहज जमू लागले.ज्या काळात मुघल साम्राज्य मोडकळीस आले होते त्या काळात एका मुलाची दिल्लीत शायरी फुलत होती.त्याच्या शाहिरीतील कल्पना विलासमुळे उर्दू शायरीचा चेहरा मोहरा बदलून गेला.हजारो वाचकांच्या मनावर आजही त्याची शायरी अधिराज्य गाजवते.असा भारताला मिळालेला तो महान शायर म्हणजे मिर्झा असदुल्ला खान गालिब ऊर्फ मिर्झा गालिब*. गझल हा शब्द उच्चारताच त्याच्याशी संबंधित एकच नाव डोळ्यापुढे येते ते म्ह...